m4marathi Forum
मराठी कविता (Marathi Kavita) => विडंबन कविता - Vidamban Kavita => Topic started by: Harishnaitam on January 20, 2020, 09:38:09 AM
-
लोक काय म्हणतात...
कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||
कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||
जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||
आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||
लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||
कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927
-
मराठी कविता,Vidamban Kavita,विडंबन कविता,marathi kavita.